Sunday, March 4, 2007

मी

आसवांना सारखे बोलावतो मी
वेदना माझ्या पुन्हा ओलावतो मी

गेली निघुनी ती जशी आलीच नाही
हे असे आता मला समजावतो मी

बोललो मी, जा, तुझा कोणीच नाही
का पुन्हा आता तुला बोलावतो मी

हा पुन्हा मी घेतला हातात पेला
घेतल्या शपथा कशा, रागावतो मी

आठवांचा गंध या मातीस येतो
पावसांत जाणे अताशा टाळतो मी

बहरली आहे, कधीची, रातराणी
का अता जाईजुई गंधाळतो मी

फाटकी पाने किती गोळा करु
का पुन्हा आयुष्य माझे चाळतो मी

No comments: